माझ्याबद्दल

माझा फोटो
'इतिवृत्त मराठी' is an initiative to convey my feelings to all of you without any prejudice. Please do read & share.

बुधवार, ३० ऑक्टोबर, २०२४

आरोग्यम् धनसंपदा..

आज दीपावलीचा पहिला दिवस 'धनत्रयोदशी'. ब्रह्म मुहूर्तावर उठून कोमट पाण्यात धने घालून आंघोळ करण्याची परंपरा. इतक्या वर्षात आज ती परंपरा मी अनुभवली. विचार आला, नेहमी हाच रूटीन फॉलो केला तर आपल्या आयुष्यातील ग्रहमान सकारात्मकतेने बदलून जायचे हो! असो..

आजच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिपती. देव-असूर संग्राम सुरू असताना समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन येणारे भगवान श्री विष्णू यांचा 'देवतांचे चिकित्सक' म्हणून अवतार असलेले असे हे भगवान धन्वंतरी. आज दीपावली म्हंटल की मार्केट मध्ये झगमगाट आणि रोशनाई असते. ग्राहक आकर्षणाकरिता दुकानांपुढे वेगवेगळे देखावे लावण्यात येतात. एकंदरीत माहौल असतो. 

पण धनत्रयोदशीचं हेच महत्व आहे का?

सकाळी कीर्तन ऐकत होतो. त्यात ते महाराज आजच्या दिवसाचं महत्व सांगताना म्हणाले की आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. आपली विकृत मानसिकता धनत्रयोदशीला पैश्यांची उधळण करून दिवस साजरा करणारी आहे. महागड्या वस्तू विकत घेऊन आपण मिरवतो. हे कुठेतरी बंद व्हायला हवं.

'हेल्थ इज वेल्थ' हे ब्रीद वाक्य प्रत्येकाने आपल्या बुद्धीच्या पाटीवर कोरून ठेवायला हवे. आजच्या प्रदूषणाने ग्रासलेल्या जगात ज्याची हेल्थ चांगली आहे, जो अगदी फिट अँड फाइन आहे, अश्या व्यक्तीला खर्या अर्थाने श्रीमंत म्हंटले पाहिजे.

बाकी, हाऊज् युअर दीपावली गोईंग? 

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

मृत्यू हीच विश्रांती..

ध्यान-अनुष्ठान केल्याने भक्ती मार्ग सापडेल, पण ह्या इहलोकातून मुक्तीचा एकच पर्याय, तो म्हणजे 'मृत्यू'..

बापरे, जरा जास्तच डीप सिरियस झालोय मी, नाही? 

पण, मला वाटत नाही हा विषय आपण सगळ्यांनी इतका गांभीर्यानं घेतला असावा जितका अपेक्षीत आहे. माझ्या व्हेरी फर्स्ट ब्लॉग मध्ये 'जोवर श्वास आहे तोवर कसल्याही गोष्टीची मला खंत वाटू नये' असं म्हणालो होतो. अजूनही तो ब्लॉग वाचला नसेल तर नक्की वाचा. त्या ब्लॉग मध्ये तुमच्या सारखाच मी सुद्धा फक्त जगण्यावरच फोकस केलं. सकाळी उठणे, कॉलेज मध्ये लेक्चर करणे, कोर्टात जाणे, घरी येऊन परत ऑफिसात जाणे, जेवण करणे आणि शेवटी झोप.

क्या लाइफ हैं, नाही? 

अ‍ॅक्च्युअली आजच्या घटकेला मी सुखी आणि समाधानी आहे. ह्याच लुप मध्ये माझा आठवडा असतो. प्रत्येक दिवस नवीन काहीतरी वेगळा अनुभव आणि शिकवण देऊन जातो. पण हे कुठेतरी थांबणार हे नक्की. काल जगलो, आज जगलो, उद्याही जगायचंय असं म्हणता-म्हणता कधी आपल्याला मरण येईल हे कोणालाच सांगता येणार नाही. किंबहुना आज मी हा ब्लॉग लिहितोय, पण मला उद्याची गॅरंटी कोणी देऊ शकेल? असो.. 

भक्तीमार्गाने मोक्ष मिळू शकतो हे मलाही मान्य आहे. पण माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी ध्यान किंवा अनुष्ठान करणे इतकं सोप्पं नाही. साधू, संत, महात्मे ह्यांना भक्तीमार्गाने मोक्ष मिळविणे सहज शक्य आहे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला ह्या भू-तलावरील इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, संसार इत्यादीतून सुटका देण्याचा फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे 'मृत्यू'! 

आपण सगळे कामात, दिनचर्येत इतके मशगूल आहोत की बोलताना सहजपणे "माझ्याकडे मारायला सुद्धा वेळ नाही" असं पटकन बोलून देतो. ह्या सगळ्या जबाबदार्‍या आणि प्रपंचातून मुक्तीचा एकच मार्ग म्हणजे 'मृत्यू'! 

झी-टॉकीज वर कीर्तन ऐकताना ते महाराज खूप सुंदर वाक्य बोलून गेले, "मरण माझे मरून गेले झालो मी अमर". किती छान ना?

आयुष्य खूप छान आहे रे, फक्त ते जगता आलं पाहिजे..

बाकी, हाउज् यूअर लाइफ गोईंग? 

स्वच्छंद..

फर्स्ट अ‍ॅण्ड फोअरमोस्ट, टु बिगिन विथ टुडेस् टॉपिक, आपल्यापैकी निम्म्या लोकांना 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्या दोन शब्...