ह्या ब्लॉगच्या टाइटलवरून तुम्हाला हे क्लीअर झालंच असेल मला काय लिहायचंय ते.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी हरिपाठ लिहिला आणि आजच्या आधुनिक युगात सुद्धा त्याची महती आहे आणि अर्थात ती द्विगुणितच होतीय.
श्रीमद्भागवत गीतेत श्रीकृष्ण अर्जुनास अध्याय दुसरे श्लोक ४७ मध्ये सांगतात 'तुमचा केवळ कर्मावर अधिकार असतो, कर्मफळावर नाही'.
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
समर्थ रामदास स्वामी महाराज रचित मनाचे श्लोक मधील उपरोक्त ओळी आहेत. आपल्या बालपणात किंवा आजतागायत हे श्लोक तुमच्या कानी निश्चितच आलं असेल. असो..
श्रीमद्भागवत गीता, मनाचे श्लोक आणि हरिपाठ ह्यातील साम्य बघितल्या गेल्यास हे तिन्ही मानवी जिवाला जगण्याची प्रेरणा देणारे उद्गार करतात.
कर्म कसलंही असो, चांगलं वा वाईट, त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळणार, हे त्रिवार सत्य नाकारता येणार नाही.
यूट्यूबवर किंवा इतर कुठल्याही सोशल साइट्सवर सो-कॉल्ड फिलैंथ्रोपिस्ट स्वतःला दानवीर सिद्ध करण्यासाठी ते करीत असलेल्या कामाचा विडिओ बनवून त्यावर इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिक लावून अपलोड करतात. बर्याचदा हीच सो-कॉल्ड फिलैंथ्रोपिस्ट मंडळी मानवतेच्या मर्यादा ओलांडताना सुद्धा दिसते. दान करण्याचं काम असं असावं की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये.
आजच्या आधुनिक युगात आपण इतके वाहवत चाललो आहोत की पौराणिक ग्रंथांचा आणि विचारांचा आपल्याला सपशेल विसर पडलेला आहे. कन्टेंट क्रिएशन चा नाद करता-करता लाइक-कमेन्ट-सबस्क्राईप करणारी जनता हीच आपण केलेल्या कामाची गणना करणारी 'इष्ट देव' असं आपण ठरवून बसलो आहोत.
माय फेलो मनुष्य मित्रहों! पुण्याची गणना करण्याचा सर्वस्वी अधिकार हा केवळ त्या ब्रह्म देवाचाच आहे.
म्हणून,
सगुण निर्गुण गुणाचें अगुण।
हरिवीण मन व्यर्थ जाय॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा