माझ्याबद्दल

माझा फोटो
'इतिवृत्त मराठी' is an initiative to convey my feelings to all of you without any prejudice. Please do read & share.

गुरुवार, २६ जून, २०२५

माल्यार्पण इज नॉट अ शो!

नुकतेच परम पूजनीय श्री गोळवलकर गुरूजी यांची पुण्यतिथी होती आणि त्या निमित्ताने नागपुरातील डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने गुरुजींना मानवंदना देण्याकरिता माल्यार्पण कार्यक्रम आयोजिला होता. अर्थात मी तेथे गेलो म्हणूनच हा ब्लॉग मला लिहावासा वाटला.

मनी ना ध्यानी, मी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आताच्या काळातील नियमित घडणार्‍या घटनेला साक्षी झालो. ती घटना म्हणजे 'फोटोग्राफी'. बार रूम तुडुंब भरून गेली होती, गर्दी इतकी की काही सुचेना. अश्यात आगमन झाले ते प्रमुख पाहुण्यांचे. ते आले, मानवंदना दिली, माल्यार्पण केलं आणि.. आणि अखेर सुरू झाला 'फोटो सेशन!' कधी एकट्याचा तर कधी ग्रुपने. पण एक मिनिटं, गोळवलकर गुरुजींच्या विचारांचं काय? त्यांनी केलेल्या कार्याचं काय? सपशेल विसर? 

रा. स्व. संघाचं डॉक्टर हेडगेवारांकडून ज्यावेळी बीज रोवलं गेलं तेव्हा गोळवलकर गुरूजींचा आद्य सरसंघचालकांशी संपर्क झाला नव्हता. गुरुजींचा हेडगेवारांशी कसा संपर्क आला ते आपण नंतर जाणून घेऊया, पण जेव्हा हेडगेवार हे आपल्या शेवटच्या दिवसांत होते तेव्हा आपले संघ कार्य कोण पुढे नेणार? असा प्रश्न त्यांना पडला आणि उत्तर होतं 'माधव सदाशिव गोळवलकर' उपाख्य 'गुरूजी'. काय महती असेल त्यांची की त्यांच्या कार्याला ओळखून डॉक्टरांनी गुरुजींना सरसंघचालक बनवले. 

गुरूजींनी पूर्ण देशभर संघ कार्याचा प्रचार केला, अख्खं भारत पिंजून काढलं, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न केला आणि संघ अजरामर ठेवण्याकरिता सतत कार्य करीत राहीले. 

संघ गीत मालेतील 'चाहिए आशिष माधव नम्र गुरूवर प्रार्थना।' हे गीत माझं वन ऑफ़ दी फेव्हरेट आहे. हे गीत ऐकुन डोळे अक्षरशः पाणावतात आणि तना-मनात ऊर्जेचा संचार होतो ते औरच! 

त्या दिवशी फोटोसेशन करणार्‍यांनी माल्यार्पण होताच गुरूजींच्या विचारांना विसंगत असे काहीसे कृत्य केलच असतील. अॅटलिस्ट आपण ज्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत त्यांच्या विषयी, त्यांच्या कार्या विषयी जरा का होईना माहिती करून ठेवावी, म्हणजे काय ना, नसता तो शो-ऑफ होणार नाही आणि समाजाच्या हिताचं काम आपण करू शकू..


मंगळवार, ३ जून, २०२५

पुण्याची गणना कोण करी?

ह्या ब्लॉगच्या टाइटलवरून तुम्हाला हे क्लीअर झालंच असेल मला काय लिहायचंय ते.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी हरिपाठ लिहिला आणि आजच्या आधुनिक युगात सुद्धा त्याची महती आहे आणि अर्थात ती द्विगुणितच होतीय.

श्रीमद्भागवत गीतेत श्रीकृष्ण अर्जुनास अध्याय दुसरे श्लोक ४७ मध्ये सांगतात 'तुमचा केवळ कर्मावर अधिकार असतो, कर्मफळावर नाही'.

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥

समर्थ रामदास स्वामी महाराज रचित मनाचे श्लोक मधील उपरोक्त ओळी आहेत. आपल्या बालपणात किंवा आजतागायत हे श्लोक तुमच्या कानी निश्चितच आलं असेल. असो.. 

श्रीमद्भागवत गीता, मनाचे श्लोक आणि हरिपाठ ह्यातील साम्य बघितल्या गेल्यास हे तिन्ही मानवी जिवाला जगण्याची प्रेरणा देणारे उद्गार करतात.

कर्म कसलंही असो, चांगलं वा वाईट, त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळणार, हे त्रिवार सत्य नाकारता येणार नाही.

यूट्यूबवर किंवा इतर कुठल्याही सोशल साइट्सवर सो-कॉल्ड फिलैंथ्रोपिस्ट स्वतःला दानवीर सिद्ध करण्यासाठी ते करीत असलेल्या कामाचा विडिओ बनवून त्यावर इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिक लावून अपलोड करतात. बर्‍याचदा हीच सो-कॉल्ड फिलैंथ्रोपिस्ट मंडळी मानवतेच्या मर्यादा ओलांडताना सुद्धा दिसते. दान करण्याचं काम असं असावं की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये.

आजच्या आधुनिक युगात आपण इतके वाहवत चाललो आहोत की पौराणिक ग्रंथांचा आणि विचारांचा आपल्याला सपशेल विसर पडलेला आहे. कन्टेंट क्रिएशन चा नाद करता-करता लाइक-कमेन्ट-सबस्क्राईप करणारी जनता हीच आपण केलेल्या कामाची गणना करणारी 'इष्ट देव' असं आपण ठरवून बसलो आहोत. 

माय फेलो मनुष्य मित्रहों! पुण्याची गणना करण्याचा सर्वस्वी अधिकार हा केवळ त्या ब्रह्म देवाचाच आहे. 

म्हणून, 

सगुण निर्गुण गुणाचें अगुण।

हरिवीण मन व्यर्थ जाय॥

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।

पुण्याची गणना कोण करी॥


स्वच्छंद..

फर्स्ट अ‍ॅण्ड फोअरमोस्ट, टु बिगिन विथ टुडेस् टॉपिक, आपल्यापैकी निम्म्या लोकांना 'स्वातंत्र्य' आणि 'स्वैराचार' ह्या दोन शब्...